Tiranga Times Maharashtra
“माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे,” असे थेट विधान खासदाराने केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका अखेर पार पडल्या. १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. या निवडणुकीत काही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र लढताना दिसली, तर काही महापालिकांमध्ये घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली.
निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून अनेक महापालिकांमध्ये महापौरपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत ठाकरे गटाच्या खासदाराने केलेल्या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत चर्चांना वेग आला आहे.
खासदाराच्या या विधानाचा नेमका रोख कोणाकडे आहे, तसेच हे वक्तव्य पक्षातील अंतर्गत नाराजीतून आले आहे का, याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
.
